घाट

संध्याकाळची वेळ होती,धाब्यावरून चहा पिऊन
दोन सरदार ट्रकववर चढले,आणि एक किलो मीटर
पुढे गेले असतील,तेवढ्यात एक भयंकर घाट लागला,
थोडी शी चुकी झाली तरी ट्रक दरीत पडलीअसती,
म्हणून सरदार ट्रक सावकाश चालवत होता.घाट लांब
होता ,एक ट्रक एक वेळेच जाईल एवढा अरुंद आणि   
वेडेवाकडे वळणे.

सरदारच्या सोबत असलेला दुसरा सरदार केव्हाच
झोपून गेला होता. ड्राइव्हरने खिशातून सिगारेटचं
बॉक्स काढले आणि काडेपेटी शोधत होता . पण काडेपेटी सापडत नव्हती त्याने शेजारी झोपलेल्या मित्राकडून घ्यावी म्हणुन त्याच्याकडं पाहिले तर तो
गाढ झोपलेला  म्हणुन त्याला न उठवता त्याच्या   खिश्यातुन पेटी काडून सिगारेट पेटविला आणि सिगारेटचे झुलके मारू लागला , गाडी चा स्पीड
थोडा वाढवुन घाट संपण्याची वाट पाहू लागला
पण घड संपायला अजून बराच वेळ लागणार होता.

अचानक सरदारला लहान मुलाचा आवाज ऐकू
येऊ लागला "पापा मला वाचवा "  पण सरदार ने
भास झाला असेल असे समजून दुर्लक्ष केलं, पण
तो अवाज अजुन जात नव्हता, गाडी दोन तीन किलोमीटर पूढे गेली तरी तो आवाज ऐकूच येत होता,सरदार घाबरला आणि त्याच्या
मित्राला उठवले,आणि त्याला त्या आवाज बदल सांगितले.  तो म्हणाला की आपण फार उंची वर आहोत
आणि हवा कमी असल्या कारणाने आवाज दिल्यावर तो खूपच उशिरा ऐकायला  जातो, पुढे गेल्यावर बंद होईल तो आवाज ,सरदार बोलला हा आवाज मला दोन किलोमीटर पासून हा आवाज ऐकू येत आहे. तू पण शांतपणे ऐक  त्याला पण तोच आवज ऐकायला
आला, दोनीही भयंकर घाबरून गेले होते, आणि आपल्या देवाचे नाव घेत होते.
तेवढ्यात ट्रकच्या दार असा अचानक उघडलं आणि
हवेच्या वेगात एक घाबरून गेलेला मुलगा मध्ये आला
सरदार  त्या मुळे सरदार अधिक घाबरले .

हिम्मत करून एक सरदाराने त्या मुलाला विचारले की
तुला कुठे जायचे आहे तर तो मुलगा फक्त " मला लांब
घेऊन जा ते मला नाही सोडणार " एवढेच बोलत होता
सरदार ने  ट्रकच्या बाजूला असलेल्या आरशात पाहिलं
तर काय ट्रकच्या मागे काही म्हतारे घोड्यांच्या पाठीवर
बसून ट्रक च्या वेगात  ट्रक च्या मागे येत होते.
सरदार ने काहीही न बोलता आपल्या गाडीचा स्पीड वाढवला आणि भरधाव वेगात गाडी चालवु लागला.
दुसरा सरदार म्हणाला सरदारजी गाडी जोरात नका चालवू नाही तर अपघात होईल , सरदार त्याला म्हणाला
दरीत गाडी गेली तर आपण एक वेळ वाजू पण ह्यांच्या हाती लागलो तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत
गाडी वेगात चालली होती , तोच ट्रक च्या समोरच्या
काचेतून दोन हात मध्ये आले आणि त्या मुलाला घेऊन गेले,  सरदार पूर्ण पाने घाबरून गेले. गाडीचा स्पीड
वाढवून त्याने गाडी तेवढी वेगात चालेल तेवढी चालवली
गाडी चालू होती समोर एक ढाबा दिसला त्याने गाडीचा
ब्रेक लावला पण त्यांनी तो ढाबा पाहिले कधी पहिला नव्हता पण त्यांना वाटले की तो ढाबा नवीन आला असावा . ढाबा चालु होता पण रात्रीची वेळ असल्यामुळे
संपूर्ण शांतता होती धब्याच्या काउंटर वर एक म्हतारा बसलेला होता . आणि  धब्याच्या मोकळ्या जागे वर दोन कुत्रे भुकत होते या  शिवाय कोणीही नव्हते
,तो काही तरी वाद्य वाजत होता
गाडी थांबली म्हणून तो खुर्चीवरून उठला आणि त्याच्या
शेजारी जाऊन थांबला, सरदार ने दोन चहा मागितली.

थोड्यावेळानंतर सरदाराने त्या म्हताऱ्याला  जवळ
बोलावलं आणि त्या घडलेल्या प्रसंगाबादल माहिती विचालली.
तो म्हातारा कडूसपणे हसला आणि तो उठला आणि
त्यांच्या  कडे पाहून सांगु लागला.

अमन आणि त्याचे वडील रात्री तलावाजवळ बसले होते

अमन : पापा आपण इथे का आलोय?
पापा: इथे आपण आपल्या जवळ असणार्या पण त्या 
            आपल्याला दिसत नाहीत अश्या शक्तीच्या शोध   
            घेण्यासाठी  आलो आहेत
अमन: कोणत्या शक्ति
पापा: भूतां ना शोधायला
अमन: पापा भूत नसतात असे आम्हाला सरांनी शिकवलं
              आहे
पापा: ते पहा मग बोल .
अमन तलावाच्या दिशेने पाहतो तर काय तिथे पाहुलांचे
ठसे पडलेले असतात,आणि ते त्यांच्या जवळ येत असतात.
अमन: पापा भूत केव्हा दिसतात.
पापा: पौर्णिमेच्या रात्रीच दिसतात.
अमन आता फक्त भुतांचा आणि पोर्णिमेचाच विचार
करत बसायचा आणि पौर्णिमा कधी येईल त्याची वाट पाहू लागला. लहान वय असते ते त्या वयात एक गोष्ट
डोक्यात घेतली की ती निघत नसते.अमन छाया बाबतीत ही असेच काही झालं.
महिन्याभर  विचार केल्यानंतर तो दिवस आला त्या दिवशी पौर्णिमा होती. तो रात्र होण्याची वाट पाहत असतो आणि निसर्गाच्या नियमा प्रमाणे रात्र झाली
त्याचे वडील शेतीचे काम करून दमले सल्या कारणाने ते लवकर झोपले  होते , अमन घराबाहेर पडतो  आणि  तलावाच्या दिशेने चालू लागतो . तलाव समोर दिसत
होता रात किड्याचा आवाज येत होता  आणि मधेच कुठे
तरी घुबड फिरक्या मारत मारत कुठे तरी लपून जायची
या व्यतिरिक्त कसलीही हालचाल नव्हती जंगलात अमन
हे वातावरण पाहून थोडा घाबरून गेला होता पण तो
मागे हटला नाही
किव्हा त्याच्या मनात घरी जाण्याचा विचार आला नव्हता अमन तलावाच्या लांब एका पिंपळाच्या झाडा जवळ
भुतांची वाट पाहत बसला आणि त्याला काहीही करून
भूत पहायचेच होते. रात्रीचे बारा वाजले असतील.तलावा जवळ भयंकर शांतता  घुबडीचा आवाज आणि रातकिड्यांचं कर्कश आवाज ह्या शिवाय कसला ही आवाज नाही.
अमनआपल्या विचारात बसलेला असतो तेवट्यात सर्व पक्षी जंगले सोडून जाऊ लागतात उन्हाळ्याचे दिवस असून सुध्दा हिवाळ्यात असते तशी थंडी वाजत होती अमन सावध नव्हता किव्हा त्याला  ह्या प्रकारची काही काल्पना नव्हती त्याला भूत म्हणजे काय हे पण माहीत नव्हते लहानपणी पासून आजी ने सांगितलेल्या गोष्टी त्याच्या लक्ष्यात होत्या तेवढ्या  त्या शिवाय त्याच्या कडे काहीच माहिती नव्हती .

भयंकर वारा सुटला होता  अचानक  एक घुबड आकाशात घिरट्या मारत होती आणि जणू तिथं काही
तरी विपरीत घटणार आहे हे तिला माहीत असावे रात्रीचे एक वाजले असतील आकाशात चांदणे शोपुन दिसत होते अचानक सर्व अंधार होतो चांदणे नाहिशे होते तरी समोर चे दृश्य पाहण्यासाठी अमन थोडा बाहेर येतो
समोर पूर्वकडून अनेक घोडे येणाचा आवाज येतो कोरड्या झाडांच्या पानावर पाय पडावा तसा आवाज
चारी बाजूंनी घुमत होता अमन नीट पाहू लागला घोडे  तलावा जवळ येऊन किंकारले, घोड्यांवर असणाले
ते लोक म्हातारे होते ते एकदम क्रूर पणे हसत होते
एक म्हातारा पुढे आला आणि आकाशात पाहिले तर त्याला तीच घुबड दिसली त्याने आपला हात लांबवला
आणि काही मिनिटात ती घुबड पकडली आणि काही
क्षणात तिला खाऊन टाकले. अमन ला खात्री झाली
हेच भूत आहे .

पौर्णिमेचा दिवशी भुतांचा देवाचा दिवस असतो .
या दिवशी सर्व भूत शुद्ध पाण्याने स्नान करून आपल्या
देवाची पूजा करतात आणि  अधिक शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतात.त्यांच्या या पूजेत कोणी  खंड
पडला तर त्याला सर्व भूत माफ करत नाहीत, असे
शास्त्रात लिहिले आहे, सर्व म्हताऱ्यानी तलावात अंघोळ करून आपल्या घोड्यांवर बसले आणि दुसऱ्या दरीकडे निकाले अमन ला झाडामागून ते भूत नीट दिसल नव्हते म्हणून तो पण झाडामांगुन निघुन त्या घोड्यांमागे जाऊ लागला.

दोन दऱ्या च्या मधील  खोल भागात अमन पोहचला त्याला कोणीही दिसले नाही वरती निळे आकाश त्याला
चांदण्याची सजवणूक रातकिड्यांचं ते रडगाणे चालू होते त्यांने ती जागा प्रथमच पहिली होती तेवढ्यात एक कावळा जिवाच्या अंतिम वेळ आली आहे आश्या वेळी
तेवढ पळता येईल तेवढे पाळावे या सारखा ओरडत
होता जणू तो अमन ला सांगत होता जा इथून लांब
पळून जा तुज्या जीवाला धोका आहे पण अमन ने त्याच्याकडे साफ दुलक्ष केले आणि आपली बेडर
नजर घुमवू  लागला. त्याला समोर काही दिसलं नाही
फक्त एक विहिर सोडून दुसरे काही नव्हते अमन विहिरी
जवळ जाणार त्याला ठेच लागली आणि अमन पडला
त्याने तो दगड पहिला आणि त्या दगडाला रागाच्या भरात उचलले आणि विहिरीच्या दिशेने तो दगड
मारला आणि तो विहिरीत पडला त्या विहिरीत भूत
त्यांच्या देवाची पूजा करत होते अमन ने त्याच्या पूजेत
खंड पडला होता म्हणून ते सर्व हवेच्या वेगात विहिरी
बाहेर आले आणि समोर अमन दिसला ते अमनच्या मागे
धाऊ लागले अमन पळत निघाला अमन पुढे आणि ते
म्हातारे मागे असा क्रम चालू होता
अमन पळत पळत घरापर्यंत पोहजला आणि घराचे दार
उघडले आणि दराचा आवज ऐकून त्याचे वडील जागे
झाले आणि अमन ला पाहून विचारले की कुठं गेला होता
अमन काहीच बोलला नाही , अमन झोपला त्याचे वडील पुस्तक वाचत बसले आणि काही वेळात अमन झोपेतून उठला आणि ओळडू लागला "वाजवा पापा वाजवा ते आलेत मला नाही सोडनार" आणि आपले अंग चोरू लागला , आमचे वडीलाना हा  सर्व प्रकार समजायला वेळ लागला नाही, आणि त्याने काही करायच्या आत दार आपोआप उघडले आणि ते म्हतारे मध्ये आले आणि आमांच्या छातीवर बसले . त्याचे वडील त्यांना सांगत
होते त्याला सोडा तो छोटा आहे त्याला माफ करा तो म्हातारा बोलला याने ती चूक केली आहे त्याला माफी नाही आमच्या पूजेत खंड पाडला आहे ह्याला माफी नाही. अमनच्या वडलांनी एक मंत्र मारला आणि ते
म्हातारे जागच्या जागी थांबले आणि अमन चे वडील बोलले अमन जेवढे पळता येईल तेवढे पळ आणि ह्याच्या हाती  कधीच येऊ नको, ये ऐकून अमन पळू लागला पण तो तीनशे वर्षे नंतर आज सापडला
सरदार म्हणाला हे सर्व तुम्हाला कसं माहीत त्यावर त्या
म्हाताऱ्याने सरदार ला मागे पहण्याचा इशारा केला
सरकारने मागे वळून पाहिले तर तिथे अमन उभा होता
आणि सरदारने परत त्या म्हातारा कडे पाहीले तर तो  तो ढाबा नाहीसा झाला होता तो म्हातारा म्हणाला अमन तर तेव्हाच मेला होता तेव्हा अम्ही त्याच्या छाती वर बसलो होतो, सरदार ला सर्व प्रकार समजला सरदारचा मित्र
केव्हाच बेशुद्ध पडला होता आणि सरदार ने गाडी च्या दिशेने पळून गाडीतून एक ग्रंथ काढला आणि त्या म्हाताऱ्याच्या समोर पकडला आणि तो म्हातारा  पळू लागले अमन ला आता मुक्ती मिळाली अमन  ची आत्मा
आकाशात गेली , सरदार त्याच्या मित्रा ला उठवले आणि गाडीत जाऊन बसला आणि देवाचे नाव घेऊन गाडी चालू गेली आणि काही वेळात त्याच्या मित्राला जाग आली आणि त्याने सरदार ला विचारले तू त्या म्हाताऱ्या ला काय दाखवले होते तर सरदार ने हसून त्याच्या  हातात हनुमान चाळीसा  दिली .

                           बजरंगबली की जय
म्हणून ते पुढे गेले आणि घाट संपवला आणि त्यांना मारुतीचे मंदिर दिसले आणि त्यांनी  मारुतीचे दर्शन घेतले आणि घरी सुखात घरी पोहजले.

Comments